Thursday, February 2, 2017

थेंब थेंब

मी एका मित्रा बरोबर नामांकित सर्विस सेटंरला गेलो... तिथं मँनेजरच्या केबीन मधे एक कस्टमर तावातावाने भांडत होता कारण काय की त्याची गाडी नीट धुतली नव्हती... मँनेजर बोलला परत धुवुन देतो साहेब हव तर बीलामधे पण डिस्कांऊट देऊ...

मी विचार केला नामांकीत ब्रँन्ड च्या सर्विस सेंटर ला दिवसाला दोनशे गाड्या येत्यात... त्या धुवायला दोनशे लीटर प्रमाणे चाळीस हजार लीटर पाणी लागते... म्हणजे चार टँकर लीटर पाणी रोज... त्याच प्रमाणे सोसायटी मधे रोज त्याच गाड्या वाँचमन कडुन रोज प्रत्येकी  दहा लीटर पाणी वापरुन धुतल्या जातात...
मला म्हणायचय  कोणाचीही गाडी स्वच्छ असावी व सगळ्यात ऊठुन दिसावी कोणाला पण वाटतय ... पण विचार करा मराठवाडा विदर्भ मधे गावोगावी रोज एक टँकर पाणी मिळत नाही  त्या लोकांच काय हाल असेल..
तुम्ही जर गाडीमागे चारशे रुपये फक्त धुवायला देता म्हणजे पाणी विकत घेता का.... ते पैशे फक्त त्या मालकाच्या खिश्यात जातात... तुमचं जेवढ बिल होत त्यामधुन जर चारशे रुपये वजा करुन पे करा... तेच पैशे अनुदान म्हनुण नाना पाटेकर यांच्या नाम किंवा एखाद्या संस्थेला दान करा... राहील गाडी धुवायच तर घरीच एखादी बादली मधे गाडी धुवुन घ्या...
पाणी सौरउर्जा हवा ह्या अश्या गोष्टी आहे ज्या आतापर्यंत तरी मोफतच मिळण्यासारख्या आहे.... ज्या लोकांकडे फोर व्हीलर ,टु व्हीलर गाड्या आहेत त्यांनी कृपया  करुन असे वाद करुन आपल्या विद्वत्तेचे शिवाय पैशाचे प्रदर्शन करु नये....
कुठलीही गाडी फक्त धुवुन व स्वच्छ ठेवुन जास्त काळ टिकते हा केवळ भ्रम आहे.. असच असेल तर मुबंई दिल्ली किंवा मोठ्या शहारतल्या लोकल ट्रेन ह्या कितीदा धुतल्या जातात  याचा आरटीआय तर्फे तुम्ही आढावा घेऊ शकतात... मी यासाठी नाही बोलत की मला काही माहीती नाही या क्षेत्रात वीस वर्ष कामाचा अनुभव आहे....
सुरुवात करा आपल्या पासुन सोशल मिडीया मधे खुप ताकद आहे... भलेही पोस्ट लांबलचक असेल पण विचार करा ... परीवर्तन हाच मुळ हेतु.....

No comments:

Post a Comment