Saturday, December 24, 2016

शिवस्मारक

पिवळी पुस्तके वाचुन इतिहासाबाबत विश्लेषण करणार्या लोकांना लोटांगण घालुन वंदन....
हे इतिहासकार कुठुन कुठुन शोध लावत असतात काय माहीत ...जगातल इतिहास संशोधन क्षेत्रातल एखाद नोबेल पारितोषिक यांना मिळायला कोणाची हरकत नसावी....

कालपासुन एक मँसेज वाचण्यात येतोय तो म्हणजे अरबी नको शिवसागर म्हणा .काही भांगाना नाव ही अंतरराष्ट्रीय पातळीवर भौगोलिक स्थानानुसार पडलेली आहे .. अरबी सागर हा भारत पाकीस्तान पासुन ते सोमालियापर्यंत  चाळीस लाख स्केवर कि.मी. एवढा पसरलेला आहे व त्या सागरात स्मारक होतय तर तुम्ही सगळा समुद्र बदलायला निघालेत ..कुठुन सुचत हे खुळ..

कालच एक पोस्ट पाहीली हात जोडलेली गोरे हात स्मायली ही भटाचे व काळे हात हे मुलनिवासीचे...गोर्या काळ्याचा भेदभाव मिटण्यासाठी जगभरातुन महापुरुष जन्मभर लडले व आज तुम्ही तोच भेद पसरवुन शातंता बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत...

शिवस्मारकाच्या आड गड व किल्ल्यांची संवर्धन करा म्हणुन टिका करणारे महाभाग ईतके दिवस काय झोपले होते का...खासदार आमदार तुमचेच, उबंरठे झिजवणारे तुमचेच....का नाही एकदाही केद्रांला जाब विचारला आतापर्यत... संवर्धनाच्या हाका झाडणारे जेव्हा पुतळे तोडुन गडावरुन खाली फेकुन दिले तेव्हा का गप्प बसलेत...फक्त पुरातन वास्तुची तोडफोड करुन ईतिहास मिटवता नाही येऊ शकत...

आज कोळीबांधव ज्या बांडगुळाच्या नेतृत्वाने फरफटत चाललाय त्याला दोन वर्षापुर्वी भाजपाने प्रवेश नाकारला होता व आज पण त्याला कोणी विचारत नाही. काही समस्या असतीलही तुमच्या तर त्यावरही बैठक घेऊन तोडगा निघु शकतो.

आज लोक शहाणी झालीय, चांगल वाईट फायदा तोटा सगळं कळत. तुमच ज्ञान पाजळण्याची काही गरज नाही. काही संघटना ह्या अतिरेक झाला का जनता आपोआप त्यांची जागा दाखवुन देते. फक्त वाईट एवढच वाटत का हे विष कालवणार्यांनां सराकार कारवाई न करता पाठीशी घालतय....

शिवाजी महाराजांच नाव घेऊन जाती जाती मध्ये घाणरड राजकारण करणार्यानो आता वेळ आलीय ...संकुचित बुध्दी ठेवुन बेडकासारखं वागण सोडुन द्या जग खुप सुदंर आहे फक्त डोळे ऊघडा...

Thursday, December 8, 2016

पोरीची मावशी...

काल चुलतभावाला मुलगी बघाया गेलतो....
पोरीची मावशी माझ्याकड बघत होती.....
आम्ही चार जण आणि तिकडचे सहाजण कसबस घरात अडजेस्ट केल....
आम्ही गेल्यावर उगाच आवसान आणुन गप्पा चालु होत्या....
चहाच पातेलं आणि  म्हतारी चागंलीच तापली होती....
पहाण्याचा कार्यक्रम झाल्यावर मोबाईलवर फोटोफोटी झाली....
दोन लहान बेमटी नुसती केकटत होती.....
पोरीची मावशी सारखी माझ्याकड बघत होती.....
मग न राहवुन मी स्वतःहुन बोललो लहान मुल लई खोडकर असतात माझी पण दीड वर्षाची मुलगी  अशीच आहे....
पोरीची मावशी माझ्याकड बघतच राहीली......

मन्या

राष्टगीतावरुन एक किस्सा आठवला.... पुर्वी पटांगणात राष्टगीताचा कार्यक्रम पार पडायचा.त्यात शाळा ही महापालीकेची असल्याने सफाई कामगार नावापुरताच.
शाळेत असताना प्राथना चालु झाली का चार मुले ही वर्गाची झाटलोट करायची नियम च तसा होता... चारपैकी तीन नेहमी बदलायची पण मन्या हा काही चार वर्ष बदलला नाही. मी म्हणायचो मन्या तुला काय राष्टगीताचं वावडं आहे का .तर तो बोलायचा तस नाहीरं पण मला अर्धा तास सतत ऊभं राहायचा कटांळा येतो...

आज.....

शाळेत शहीद जवानांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होता व मुख्याध्यापक मन्याच्या फोटोला हार घालुन वंदन करत होते.........