Thursday, December 8, 2016

मन्या

राष्टगीतावरुन एक किस्सा आठवला.... पुर्वी पटांगणात राष्टगीताचा कार्यक्रम पार पडायचा.त्यात शाळा ही महापालीकेची असल्याने सफाई कामगार नावापुरताच.
शाळेत असताना प्राथना चालु झाली का चार मुले ही वर्गाची झाटलोट करायची नियम च तसा होता... चारपैकी तीन नेहमी बदलायची पण मन्या हा काही चार वर्ष बदलला नाही. मी म्हणायचो मन्या तुला काय राष्टगीताचं वावडं आहे का .तर तो बोलायचा तस नाहीरं पण मला अर्धा तास सतत ऊभं राहायचा कटांळा येतो...

आज.....

शाळेत शहीद जवानांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होता व मुख्याध्यापक मन्याच्या फोटोला हार घालुन वंदन करत होते.........

No comments:

Post a Comment